पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छुपी निष्ठा दुसरे काय

 जे जे लोक आज भारतसमोर प्रश्न बनून अथवा निर्माण करून भारताचे नुकसान करता आहेत ..अशांच्याच चर्चा जिकडे तिकडे होताना दिसतात .. पण जे कोणी देशासमोरील प्रश्न कसोशीने सोडविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांच्या बद्दल दोन शब्द बोलायला कोणाला सवड नाही... त्यांच्या बद्दल बोलले को आपण एका वेगळ्या गटात मोजले जाऊ की काय अशी भीती सर्वांना वाटत असावी नाही.. अशी कातडीबचाव वृत्ती काय कामाची? देशासाठी काम करणाऱ्याला सच्च्या माणसाला साथ देणे म्हणजे आपल्या छुप्या निष्ठेलाच सुरुंग की काय ? आपण उघडे पडू... Hmm उगाच आपले  हा असे बोलला तो तसे बोलला म्हणत त्यांचाच प्रचार करत राहायचे ..म्हणजे मीडिया स्पेस occupy करून ठेवायची याला विशेष अर्थ आहे... तो अर्थ एकच गांधी नेहरू काँग्रेस विरोध...

राष्ट्रपिता

 RTI कशी काय चुकीची माहिती देईल..?  म्हणजे..   संविधानिक बाब म्हणजे कायदेशीररित्या राष्ट्रपिता असे कुठे नमूद नसेल ही ..  गांधी स्वतःला महात्मा म्हणवून घेणे पसंत करत नसत.. परंतु त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी स्वतः नेताजी यांनी दिली त्यांचे म्हणणे असे होते की ... 1857 आणि पूर्वी अनेक राज्ये आपापल्या राजेशाही टिकविण्याच्या हेतूने राज्याच्या स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेशी लढत होते.. छोटे छोटे शेकडो राज्ये होती.. परंतु Gandhi भारतात आल्यावर भारतीय जनतेचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळवायचे असेल तर उभा भारत खंड एकत्र यायला हवा या करिता एक भावनेने लढायला हवे उभे राहायला हवे जे या पूर्वी कधीच झाले नव्हते .. झाशी ची राणी स्वतःच्या राज्यासाठी लढली  अर्थात आपल्या जनतेसाठी बंगालचा नवाब तेथील जनतेसाठी साठी इतकेच काय बादशाह सुद्धा लढत होता दिल्ली साठी इंग्रजांच्या विरोधात... मग एक देश कसा उभा करणार .. या करिता  भारत भ्रमण करून देश समजून घेऊन जनतेत तशी एकतेची भावना निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन देश पिंजून काढून सर्वांना एकत्र उभे केले स्त्रियांनाही समान भवनेने एकत्र उभ...
 खरंच हे खूप दुःखद आणि निराशाजनक आहे... गांधीजींनी अवघ्या जगाला प्रेरणा दिली सर्व जाती जमातींच्या पलीकडे जाऊन एकता समता आणली.. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात उभे करण्यात खंबीरपणे मोठे कार्य केले पण तरीही आपल्या कडे घोषणा देतानाही शाहू फुले आंबेडकर असेच एवढेच म्हटले जाते गांधी वगळला जातो.. गांधी नसते तर कदाचित भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्वरूप जागा वेगळे झाले ये तसे झाले नसते कदाचित इतरांच्या मार्गावर पाऊल टाकून भारत पुढे गेला असता तो किती गेला असता हे मात्र सांगता येत नाही.. कारण भारत विभिन्न राज सत्तांत विभागलेला होता.. आणि तो तसाच राहण्याची जास्त शक्यता होती.... देश पिंजून काढून एकतेची भावना निर्माण झाल्याने आणि निवडलेली वाट जगावेगळी असल्याने भारत नेत्रदीपक कार्य सर्वच क्षेत्रात करू शकला ज्यामुळे भारताचे नाव स्वातंत्र्यानंतर लगेच घेतले जाऊ लागले.. अर्थात  आपाआपल्या  नेतृत्वात विभिन्न स्तरावर केलेले जननेत्यांचे  कार्य विसरता च येत नाही पण गांधींनी सर्वांना एक सूत्रात बांधण्याचे केलेले कार्य हे खूप मोठे आहे... ह्याची जाण ठेवून आपण सर्व भेद विसरून एकत्र  आल...