बा ..बापू...
बा ..बापू... धोतर लेवून, लेखणी, चष्मा घेऊन गोमुखासनात बसणारा अवलिया जगाला देतो अनमोल शांतीचे ऐश्वर्य़... भराभरा लिहित जातो आपल्या गिजमिज्या अक्षरांनी चळतीच्या चळती, तावच्या ताव... कशा कळतात मुद्रकाला कोण जाणे त्याच्या कागदाचे भाव ..... जगभर लोक वाचतात आतूर होऊन पुढे काय, पुढे काय... .. सांगतो आत्म्याला सुखावणारे, असे काही तो बोलतो... किडमिड्या अक्षरातून भाव मात्र चोख, हृदयाला पोचतात.. जणू दिसते त्याला पुढचे सारे तो जपायला सांगतो एकमेकांना नी जपायला शिकवतो पाणी सृष्टी प्राणीमात्र... भूतदया श्रद्धा प्रेम शांती करूणा आणि अहिंसा ... तो शिकवतो सूत कातायला नी लज्जा राखायला तो सांगतो जमीन राखायला नी प्रेम फुलवायला तो शिकवतो हातात हात घालून नांदायला त्याचे हातच मोठे , आजाणूबाहूच तो रामकृष्णबुद्धा सारखा ख्रिस्तालाही जवळचा सर्वांचाच आपला असा ... त्यामुळेच जगाने त्याचा मानवतेचा एकमेव धर्म सर्वोपरी हे मानले. सर्व धर्मांचे मूळ नी सार एक, अखिल मानवजातीचे सुख... किती सरळ, साधे आहे त्याचे वागणे, बोलणे नी जीवन.. म्हणून आज त्याचे महत्व मुद्दाम समजून घ्याव...