खरंच हे खूप दुःखद आणि निराशाजनक आहे... गांधीजींनी अवघ्या जगाला प्रेरणा दिली सर्व जाती जमातींच्या पलीकडे जाऊन एकता समता आणली.. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात उभे करण्यात खंबीरपणे मोठे कार्य केले पण तरीही आपल्या कडे घोषणा देतानाही शाहू फुले आंबेडकर असेच एवढेच म्हटले जाते गांधी वगळला जातो.. गांधी नसते तर कदाचित भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्वरूप जागा वेगळे झाले ये तसे झाले नसते कदाचित इतरांच्या मार्गावर पाऊल टाकून भारत पुढे गेला असता तो किती गेला असता हे मात्र सांगता येत नाही.. कारण भारत विभिन्न राज सत्तांत विभागलेला होता.. आणि तो तसाच राहण्याची जास्त शक्यता होती.... देश पिंजून काढून एकतेची भावना निर्माण झाल्याने आणि निवडलेली वाट जगावेगळी असल्याने भारत नेत्रदीपक कार्य सर्वच क्षेत्रात करू शकला ज्यामुळे भारताचे नाव स्वातंत्र्यानंतर लगेच घेतले जाऊ लागले.. अर्थात  आपाआपल्या  नेतृत्वात विभिन्न स्तरावर केलेले जननेत्यांचे  कार्य विसरता च येत नाही पण गांधींनी सर्वांना एक सूत्रात बांधण्याचे केलेले कार्य हे खूप मोठे आहे... ह्याची जाण ठेवून आपण सर्व भेद विसरून एकत्र  आलो तर आया सारखे आपणच असू नेमके हेच जगातील अनेकांना नको आहे हे आपण का ओळखत नाही ... हे अनाकलनीय आहे ( तसे इतकेही अनाकलनीय नाही म्हणा) एकत्र येवून आपले घर आपणच सावरायला हवे एकजुटीने बाहेरच्यास उत्तर देणे सोपे होते...  आपल्यातच भेद निर्माण करून कोणीतरी निवांत मलई खात आहेत हे न कळण्या इतके काही आपण अज्ञानी नाहीच  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी