मूळ RTE चे उद्दिष्ट होते सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम वेगवान होणे . परंतु हल्ली संधीसाधू लोकांनी त्याचा बिजनेस मॉडेल बनवून मूर्ख दिशाहीन पालकांना जनतेला भुलवून मोठमोठ्या शाळांमध्ये मुलांना तात्पुरत्या मोफत शिक्षणाची लालूच दाखवून उत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा  ओस पाडणे व त्यांच्या बुडाखालची जमीन बळकावणे हा बिजनेस मॉडेल बनवला आहे.  बहुतेक पालक ह्याला बळी पडून ह्या अंध लूटीत त्यांचे हात मजबूत करून देशाचे नुकसान करत आहेत . जनतेने जागरुक व्हावे . आपल्या म्युनिसिपालिटीच्या शाळांवर लक्ष केंद्रित करावे मुलांना तिथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण द्यावे जेणेकरून शाळा व शिक्षण व्यवस्था यांना आपण वाचवू शकू . अन्यथा लवकरच फ्री मोबाईल कनेक्शन फ्री नेट प्रमाणे सुरुवात करून जनतेला येत्या काही वर्षातच प्रचंड लूटीला सामोरे जावे लागेल . त्यावेळी काहीच पर्याय राहणार नाही .व पश्चाताप करायला वेळ पुरणार नाही ... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी